बेळगावात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 149 घरांची भरपाई होणार रद्द

damaged by house in heavy rain for last year 149 people compensation was cancelled in belgaum
damaged by house in heavy rain for last year 149 people compensation was cancelled in belgaum
Updated on

बेळगाव : बेळगाव शहरात 2019 साली झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ज्या 628 घरांच्या मालकांना शासनाकडून भरपाई मंजूर झाली आहे, त्यातील 149 घरमालकांची भरपाई रद्द होणार आहे. बेळगाव महापालिकेने त्यांची यादी तयार केली आहे. ती यादी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या आश्रय विभागाने ही यादी सोमवारी (9) आयुक्त के. एच. जगदीश यांना सादर केली. जगदीश यांनी यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची सूचना केली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून बजावण्यात येणार आहे. 

ऑगस्ट 2019 मध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले. महापालिका तसेच महसूल विभागाने या घरांचे सर्वेक्षण केले. त्यात बेळगाव शहरात 628 घरांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. घरांच्या नुकसानीचे प्रमाण लक्षात घेवून त्यांची 'अ' व 'ब' अशी दोन प्रवर्गात वर्गवारी करण्यात आली होती. 494 घरांचा समावेश 'अ' प्रवर्गात तर 134 घरांचा 'ब' प्रवर्गात समावेश करण्यात आला होता. पण आता 'अ' प्रवर्गातील 96 तर 'ब' प्रवर्गातील 53 घरांची भरपाई रद्द होणार आहे. यापैकी काही घरांच्या मालकांना शासनाकडून भरपाई मिळाली आहे. तर काही घरमालकांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. 

ज्यांना भरपाई मिळाली आहे, त्यांच्याकडून ती रक्कम परत घेतली जाईल, ज्यांना अजून मिळालेली नाही त्यांची भरपाई रद्द केली जाईल. महापालिकेच्या आश्रय विभागाच्या मते 628 पैकी 50 घरांच्या कामाची सुरूवातच झालेली नाही. तर 50 घरांबाबत पालिकेकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. 4 घरांची भरपाई आधीच रद्द करण्यात आली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ते अपात्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत दोघांकडून भरपाईचे पैसे परत घेण्यात आले आहेत. त्यांनी चुकीची माहिती देवून भरपाई मिळविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यात अनगोळ येथील एका गॅरेजमालकाचा समावेश होता. गेल्या वर्षी ज्या घरांचे नुकसान झाले, त्या घरांना तातडीने भरपाई दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. 

गतवर्षी गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमण्णा स्वतः बेळगावात आले होते. त्यांच्या हस्ते पडझड झालेल्या घरांच्या दुरूस्ती कामाची सुरूवात करण्यात आली होती. वर्षभरानंतर सोमण्णा बेळगावात परत आल्यानंतर त्यानी या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी अनेकांना भरपाईच मिळाली नाही हे त्यांना कळले. शहरातील पाटील गल्ली येथील अनेक घरांचे नुकसान झाले होते, त्यातील एकाच घरमालकाला भरपाई मिळाली आहे. सध्या 479 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, पण वर्षभरात एकाही घराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com