Government Land : दत्त टेकडीजवळची ६ एकर जमीन शासनाची
Court Verdict : दत्त टेकडीजवळील कोट्यवधींच्या किमतीची ६ एकर जमीन अखेर शासनाची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवळ ताबा म्हणजे मालकी नाही, तर मूळ कागदपत्रे आवश्यक असतात, असे ठाम मत नोंदवत जिल्हा न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला.
ईश्वरपूर : ‘केवळ ताबा असल्याने मालकी सिद्ध होत नाही; जमिनीवरील हक्कासाठी मूळ कागदपत्रांची आवश्यकता असते,’ असे सांगत दत्त टेकडीजवळची ६ एकर सरकारी जमीन खासगी हक्क सागणाऱ्यांकडून शासनाला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.