इस्लामपूर : कोरोनाची दुसरी लाट येऊन पुन्हा लॉक डाऊन पडणार अशी माहिती प्रसार माध्यमाद्वारे समोर येत असल्याने नुकताच सावरलेल्या शेतकर्याचे पुन्हा धाबे दणाणले आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके लॉकडाऊन पडल्यास तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने इस्लामपूर शहरात शिरकाव केला होता.ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात संपूर्ण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले होते. सात महिन्याच्या कालावधीत जिल्हा बंदी, संपूर्ण राज्यात बाजरापेठ बंद होत्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार पेठच उपलब्द नसल्याने शेतातील उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला.यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
यामधून नुकताच कसाबसा शेतकरी सावरला आहे. मोठ्या आशेने जोमाने कामाला लागून पिके उभी करण्यात सुरवात केली आहे. इथून पुढील काळात चांगला भाव मिळेल या आशेने भाजीपाला लागण केली. सवरतोय न सवरतोय तो पर्यंत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उभी केलेली भाजीपाला पिके पुन्हा लॉकडाऊन पडला तर काय करायची या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने चार महिने कालावधीत उत्पादन सुरू असणाऱ्या भाजीपाला पिकांना त्याचा धोका जास्त आहे. यात काकडी, वांगी, भेंडी, दोडका, कारले यांचा समावेश होतो. या पिकांसाठी एक ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च केला जातो. एवढे करून उत्पादन सुरू होण्याच्या वेळीच लॉक डाऊन पडला तर बाजारपेठा ठप्प होऊन शेतमाल हातचा वाया जाण्याची शक्यता आहे.
"कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात 20 गुंठे टोमॅटो,20 गुंठे वांगी हे पीक घेतले होते. लॉक डाऊन, संचार बंदी याचा फटका बसून साधारण 5 लाख रुपयांचा तोटा झाला होता. त्यातून सावरत एक महिन्यापूर्वी तीस फ्लावर भाजीपाल्याची लागण केली आहे. विक्रीच्या वेळी नेमका लॉक डाऊन पडला तर पुन्हा एकदा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे."
- सचिन म्हस्के, भाजीपाला उत्पादक शेतकरी, नेर्ले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.