सांगली, ः जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत 46 हजार 215 लोक महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून व इतर राज्यातून आले आहेत. बाहेरुन येणाऱ्यांची सक्तीने चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी आशा वर्कर, आरोग्य यंत्रणेला दिले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
झेडपीचे सीईओ श्री. राऊत यांनी सर्व गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत सूचना दिल्या. दरम्यान ग्रामपंचायतींच्या सुधारीत 15 वित्त आयोग आराखड्यात पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच वृक्षारोपण, मनरेगाच्या कामांना प्राधन्य द्या असेही सांगितले.
जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना गरजेनुसार होम क्वॉरंटाईन तसेच संस्था क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. होम क्वांरटाईन केलेल्या लोकांची संख्या अधिक असुन त्यांच्या आरोग्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. कारण त्यांना चुकून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर त्यांच्या संपर्कातील इतर अनेक लोकांनाही मोठ्या प्रमाणात लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा वर्कर व आरोग्य विभागाच्या माध्यमातुन या लोकांच्या भेटी नियमित घ्या. काही लक्षणे आढळली तर तातडीने पुढील कार्यवाही करा असे आदेश देण्यात आले.
शासनाकडुन 15 व्या वित्त आयोगाचा आराखडा मागवला आहे. ग्रामपंचायतींकडुन हा आराखडा पाठवण्यात आला होता. मात्र त्यामध्ये काही बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करताना 50 टक्केपर्यंत पाणी पुरवठा व स्वच्छता या कामांना प्राधान्य देण्याचे आले आहेत. याशिवाय मनरेगाच्या कामांमध्येही वैयक्तीक कामांचा अधिक समावेश करावा, वृक्षारोपणला प्राधान्य देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.