अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

यावर्षी मात्र वेळेत पाणी विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.
अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला (sangli-kolhapur) ज्या धरणाच्या पाणी साठ्यामुळे पुराचा मोठा फटका बसतो. त्या अलमट्टी धरणातून (almatti dam) सध्या 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 2019 मध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे या धरणातून नियमितपणे पाणी विसर्ग व्हावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून (maharashtra government) तसेच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून होत राहिली. तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्नाटक सरकार विरुद्ध महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिक संताप व्यक्त करत राहिले. दरम्यान यावर्षी मात्र वेळेत पाणी विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com