शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Ajit Pawar
Ajit PawarSakal
Summary

या निर्णयानंतर कोल्हापुरात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात फटाक्या लावून जल्लोष केला.

कोल्हापूर : राज्य सरकारने अवसायनात काढलेल्या राज्यातील पंधरा भूविकास बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज व कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर कोल्हापुरात (kolhapur) कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात फटाक्या लावून जल्लोष केला.

Ajit Pawar
'या' कारणासाठी समरजितसिंहांनी मानले गडकरींचे 'आभार'

550 पैकी 267 कोटी हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तर 283 कोटी हे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापोटी मिळणार आहेत. (farmers) या बदल्यात पंधरा भूविकास बँकेच्या मालमत्ता सरकार ताब्यात घेणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णय होणार असून कर्मचाऱ्यांना 12 कोटी 41 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com