पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा

पूरग्रस्तांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्यानंतर त्यांनी विमा कंपन्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली.
पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा

कोल्हापूर : पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात विमा कंपन्यांनी (insurance company) टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje) यांनी केली. चिपळूण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास संभाजीराजे यांनी भेट देऊन केली. त्यावेळी पूरग्रस्तांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्यानंतर त्यांनी विमा कंपन्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली. (chiplun flood)

संभाजीराजे म्हणाले, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात विमा कंपन्या आडमुठी भूमिका घेत आहेत. पूरामध्ये शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेले व्यवसाय, या पुरामध्ये झालेल्या नुकसानामुळे अधिकच संकटात सापडले आहेत. मात्र, याकडे कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. विमा कंपन्या याचा गैरफायदा घेत असून, नुकसान भरपाई देण्यास अवास्तव कारणे देऊन टाळाटाळ करत आहेत."

पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा
'संभाजीराजे छत्रपतींना दिलेले आश्वासन राज्यसरकारने पाळावे'

नुकसानाची योग्य तितकी भरपाई विमा कंपन्यांकडून करण्यात यावी, यासाठी शासनाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. चिपळूण, महाड, कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्त सर्वच भागात विमा कंपनी यांनी भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com