
Agriculture Day Maharashtra : एक जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. एकीकडे कृषी दिन साजरा करताना दुसरीकडे शेती पिकण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांची वीजबिल सवलत राज्य शासनाने बंद केल्यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा कणा मोडला आहे. जिल्ह्यातील साडेसहाशे तर राज्यातील दोन हजार सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.