कोल्हापूर : पुराची भरपाई न देण्याचा निकष त्वरित रद्द करा

पूरग्रस्त समितीतर्फे सहकार निबंधकांना निवेदन
 mahapur
mahapursakal

कोल्हापूर : नियमितपणे कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी म्हणून ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. परंतु ५० हजार सानुग्रह मिळालेल्या शेतकऱ्यांना पुराची नुकसान भरपाई न देण्याचा निर्णय पुनर्विचार करून हा निकष त्वरित रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन पूरग्रस्त समितीतर्फे सहकार निबंधकांना निवेदन दिले, शिष्टमंडळाचे नेतृत्व बाजीराव खाडे यांनी केले.

महात्मा फुले कृषी कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला पण नियमित कर्ज भागविणान्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नव्हता. सानुग्रह अनुदान कर्जमाफी योजनेत ठराविक कालावधीतच कर्ज परतफेड करण्याचा लावलेला निकष रद्द करून कर्जमाफी न मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळावा अशी मागणीही केली. सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीचा हा निर्णय घेतला.

असला तरी पूर नुकसान भरपाई मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये अनुदानाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा शिष्टमंडळात केवलसिंग रजपूत, बी. आर. पाटील, उत्तम काबोरे, मच्‍छिंद्र मडके, एन. डी. खाडे, विनोद यादव, बलवंत खाडे, बी. डी. खाडे, सदाशिव खाडे, विश्वास चौगले, श्रीकांत पाटील, सदाशिव पाटील, भिकाजी पाटील, कृष्णात कुंभार, पिराजी मेथे, सागर शिर्के, विजय गायकवाड आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com