भादवण : कोवाडे व पेद्रेवाडी शिवारात वनगाईंनी धुमाकूळ घातला आहे. ऊस, उन्हाळी पिकांचे हा कळप नुकसान करीत आहे. त्यांच्या वावराने शेतकरी हैराण झाले असून वनविभागाने या गाईंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
पेद्रेवाडीतील चाळोबा डोंगर परिसरात हा कळप ठाण मांडून आहे. येथून तो रात्रीच्या वेळी शेतात उतरतो. शेतातील उभे पीक तो फस्त करीत चालला आहे. बाळकू पोवार, सदानंद पोवार, गणपती पोवार या कोवाडे येथील शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचे कळपाकडून नुकसान झाले आहे. पेद्रेवाडी येथे रेडेकर, येजरे यांचेही नुकसान केले आहे.
यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने हिरण्यकेशी नदीमध्ये पाण्याचा साठा चांगला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी उन्हाळी पिकांच्याकडे वळला आहे. भुईमूग, मिरची व अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ही पिके कळपाने फस्त करण्यास सुरवात केली आहेत. शेतकऱ्यांनी वनगाईंना रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या पण कळप बधेनासा झाला आहे. वनविभागाने ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हरपवडेत गव्यांकडून नुकसान
हरपवडे परिसरातील पिकांचे गव्यांच्या कळपाने नुकसान सुरू केले आहे. गोविंद गुरव यांचे दीड एकरातील उस पिकाचे या कळपाने नुकसान केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.