जीव गेला तर त्यांचा जातो, आम्ही का डोकं खाजवायचं; 'या' मंत्र्यांचे वक्तव्य  

Minister of State for Railways Suresh Angadi Controversial statement on coronavirus
Minister of State for Railways Suresh Angadi Controversial statement on coronavirus
Updated on

बेळगाव - जिल्ह्यातील कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण डॉक्‍टरांचा सल्ला ऐकत राहिल्यास जीवंत राहतील. अन्यथा जीव गमावतील. त्याला आम्ही डोकं का म्हणून खाजवून घ्यायचे, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी काढले. 

उज्वल योजनेची माहिती देण्यासाठी मंत्री अंगडी यांनी आज (ता.24) पत्रकार परिषद आयोजली होती. यावेळी जिल्ह्यातील क्वारंटाईन व्यवस्थेबाबत पत्रकारांनी प्रश्‍न उपस्थित केले. त्याला उत्तल देताना मंत्री अंगडी बोलत होते. 

पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांचे एकत्र क्वारंटाईन सुरु आहे. क्वारंटाईन प्रणाली फेल ठरल्याचा आरोप सुरु आहे. त्याबाबत अंगडी विचारले असता ते म्हणाले, किती वेळा हाच विषय उपस्थित केला जातो. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. त्याचा अर्थ क्वारंटाईन व्यवस्थित होत आहे. पण, क्वारंटाईनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांनी डॉक्‍टरांचा सल्ला ऐकला नाही. तर तेच जीव गमावतील. त्याला आम्ही डोके का म्हणून खाजवून घ्यायचे, असे उत्तर दिले. 

सोशल डिस्टस्टिंग पाळले जावे, असे सतत सुचविले जाते. डॉक्‍टर, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सूचना दिल्या आहेत. पण, त्याचे पालन न केल्यास तेच मरतील. त्याला आम्ही का म्हणून डोके खाजवून घ्यायचे, असे उत्तर दिले आहे. एक खासदार व केंद्रीय मंत्र्यांच्या या स्वरुपाचे वक्तव्य कितपत योग्य? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com