
पान ३
बिंदू चौकात शाहू महाराजांचा
२६ जूनपर्यंत पुतळा उभारा
...अन्यथा आंदोलन; शरद पवार विचार मंचची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदू चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा येत्या २६ जूनपर्यंत उभारावा, अशी मागणी शरद पवार विचार मंचचे शहराध्यक्ष किसन कल्याणकर व जयकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. पुतळा न उभारल्यास उपोषण, धरणे आंदोलन अथवा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. श्री. कल्याणकर म्हणाले, ‘‘बिंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे पुतळे आहेत. बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी कामगारमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. त्याला १० वर्षे उलटली आहेत.’’
पुतळा बसविण्याबाबत कोणतीच हालचाल नाही. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘तत्कालीन महापौर हसिना फरास यांच्या कार्यकाळात ठराव झाला होता. त्याला निधीही मंजूर केला होता. दोन्ही मंत्र्यांनी २०१३ ला केलेल्या घोषणेनुसार पुतळा बसविण्याच्या हालचालीही सुरू होत्या. शाहू स्मृतिशताब्दी वर्षात तरी पुतळा बसवावा.’’
यावेळी जहांगीर अत्तार, अर्जुन शिंदे, बाबा जगताप, विनोद डुणूंग, लक्ष्मण मोहिते, किरण भोसले, अण्णाप्पा खमलेहट्टी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..