यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्या झाल्या दुर्मीळ

यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्या झाल्या दुर्मीळ

बैलजोडीचा फोटो संग्रहित वापरावा
.....................................
यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्या झाल्या दुर्मीळ

शेतीकामासाठी सर्रास ट्रॅक्टर, पॉवर टिलरचा वापर; बैलांच्या किमतीही आवाक्याबाहेर

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. २९ : शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढल्याने एकेकाळी बळिराजाच्या गोठ्याचे वैभव असलेल्या ‘सर्जा-राजा’च्या जोडीला उतरती कळा लागली आहे. शेतकरी आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळल्याने बैलजोडीचा शेतीकामासाठी होणारा वापर कमी झाला आहे. परिणामी ग्रामीण भागात यांत्रिक शेतीने बैलांची संख्या कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आजही ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पूर्वीपासून शेतीसाठी बैलजोडीचा वापर केला जात होता. बैलजोडीशिवाय शेती नाही, असे शेतकऱ्यांचे पूर्वीचे चित्र होते. जमीन नांगरणी, चिखल करणे, भरणीची कामे यासाठी शेतीसाठी बैलजोडीचा उपयोग होत होता. शेतकऱ्याचे अर्थकारण पूर्णतः बैलजोडीवर अवलंबून होते. त्यामुळे ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी शेतकऱ्याच्या दावणीला हमखास असे. त्यातच पूर्वी बैलजोडीचे दरही अवाक्यात होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरात बैलजोडी हे गोठ्याचे वैभव होते.
सध्या शेतकऱ्यांनी शेतीत यांत्रिकीकरणावर भर देऊन आधुनिकतेची जोड दिली आहे. शेतीत नवनवे आधुनिक तंत्र वापरून शेतकरी उत्पादने घेत आहे. शेतकरी मशागतीसाठी सर्रास ट्रॅक्टर, पॉवर टिलरचा वापर करत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे रोटावेटर आहे. त्यामुळे शेतीतील कामासाठी बैलजोडीचा वापर फार कमी झाला आहे. त्यातच चाराटंचाई, बैलजोडीच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालल्याने शेतकऱ्यांचे वैभव समजल्या जाणाऱ्या बैलजोड्या आता दुर्मीळ झाल्या आहेत.
सध्या धामोडसारख्या साडेसहा हजार लोकवस्तीच्या गावात केवळ १३ बैलजोड्या आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून वाढलेले बैलांचे दर त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. शेतीचे कमी क्षेत्र असलेले शेतकरीही सर्रास रोटावेटरचा वापर करतात. त्यामुळे बैलांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे.
.............
कोट :
गेल्या २० वर्षांपासून बैलजोडी सांभाळतो. पूर्वी स्वतःची शेती करून इतर शेतकऱ्यांच्या शेतात ऊस भरणे, नांगरणी, भात रोप लागणीसाठी चिखल तयार करणे अशी कामे करतो; परंतु आता शेतीत ट्रॅक्टर, पॉवर टिलरचा वापर वाढला आहे. तरीही शेतीतील कामासाठी आपणाला बोलावतात.
दत्तात्रय धनवडे, बैल सांभाळणारे शेतकरी
.........
कोट :
सध्या बैलजोडीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे शेतीसाठी बैलजोडी सांभाळणे परवडण्यासारखे नाही. शेतीकामासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलरचा वापर केला जातो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी भरणी ही सर्व कामे होत असल्याने ट्रॅक्टरलाच पसंती दिली जाते.
बाबूराव पाटील, शेतकरी
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com