संकटकाळी धैर्य सोडू नका संघर्ष करा यश तुमचं आहे : आचार्य विशुद्ध सागर जी महाराज

संकटकाळी धैर्य सोडू नका संघर्ष करा यश तुमचं आहे : आचार्य विशुद्ध सागर जी महाराज

02998
संकटकाळी धैर्य सोडू नका
आचार्य विशुद्धसागरजी महाराज ः वळिवडेत प्रवचन

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर, ता. १२ : मनुष्याने संकटकाळी धैर्य सोडू नये, जो धैर्य सोडून अधीर होतो, तो अडचणीत येतो. जो संकटात सामना करतो त्याच्यावरील संकट दूर होते. जसा विचार तसा आचार, मन बदला जग बदलेल. मनातील भाव शुद्ध ठेवून जगायला शिका म्हणजेच पुण्याचा मार्ग स्वीकारा, असे प्रतिपादन चर्या शिरोमणी आचार्य श्री १०८ विशुद्ध सागरजी महाराज यांनी केले. ते वळिवडे (ता. करवीर) येथील जैन मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचनात बोलत होते.
आचार्य विशुद्ध सागरजी महाराज म्हणाले, ‘‘पाप आणि पुण्य याची पारख ठेवा. प्रत्येकात परमेश्वर आहे; पण तो ओळखता आला पाहिजे. त्यासाठी त्याग महत्त्वाच आहे.’ दरम्यान हेरले येथील पंचकल्याण महोत्सवाची सांगता करूण नांदणी येथे आयोजित असलेल्या चातुर्मास कार्यक्रमास प्रस्थान करण्यासाठी विशुद्ध सागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रमण सुव्रतसागरजी मुनी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मुनीश्री सहसंग यांचा विहार वळिवडे येथील दिगंबर जैन मंदिरात पार पडला. रविवारी सकाळी त्यांची पदयात्रा चिंचवाड, वसगडे, पट्टणकोडोली मार्गे पुढे नांदणी येथील चातुर्मास कार्यक्रमासाठी प्रस्थान झाली. यावेळी वळिवडे, चिंचवाड, वसगडे येथील समस्त दिगंबर जैन कमिटी, वीरसेवा दल, वीर महिला मंडळ, श्रावक, श्राविका व गावातील भक्तगण मोठ्या संख्येने प्रवचन, प्रस्थान शोभयात्रेत सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com