उपनगरांच्यामध्ये पाणी- बाणीची परिस्थिती

उपनगरांच्यामध्ये पाणी- बाणीची परिस्थिती

गांधीनगरसह १३ गावांतील पाणी
आठवड्यातून एक दिवस बंद

महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

गोकुळ शिरगाव, ता. १० : कडक उन्हाळ्यामुळे नदीपात्र आणि धरण भागातील पाणीसाठा कमी प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित व्हावा यासाठी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाने प्रादेशिक गांधीनगर आणि इतर १३ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठवड्यामधील एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
उपनगरांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. प्रादेशिक गांधीनगर आणि उर्वरित तेरा गावांमध्ये दररोज ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या योजनेतून होणारा पाणीपुरवठा मे आणि जून या दोन महिन्यांसाठी सुरळीत सुरू राहण्यासाठी समाविष्ट केलेल्या १३ गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाने केलेला आहे. यासोबतच गावाला ठरवून दिलेल्या कोट्यामधीलच पाणीपुरवठा गावाला केला जाणार आहे. अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार नाही; असा इशाराही महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाने सर्व ग्रामपंचायतींना दिलेला आहे. या सर्व सूचनेची माहिती सर्व ग्रामपंचायत यांना परिपत्रकामार्फत दिलेली आहे.

योजनेत समाविष्ट गावांचा
पाणीपुरवठा बंद दिवस

सोमवार - उंचगाव, शांतीनगर, मणेरमळा
मंगळवार- गोकुळ शिरगाव
बुधवार - सरनोबतवाडी, वळिवडे
गुरुवार - पाचगांव
शुक्रवार - कणेरी
शनिवार - गांधीनगर, उजळाईवाडी
रविवार - गडमुडशिंगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com