कोल्हापूर, सांगलीतील महापूर मानवनिर्मितच

कोल्हापूर, सांगलीतील महापूर मानवनिर्मितच

08169
आलास : येथे पूरमुक्ती जनसंवाद यात्रेत धनाजी चुडमुंगे यांनी मार्गदर्शन केले.
----------
कोल्हापूर, सांगलीतील महापूर मानवनिर्मितच
धनाजी चुडमुंगे; आलासमध्ये पूरमुक्ती जनसंवाद यात्रा
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १० : विकासाच्या नावाखाली नदीपात्रात अडथळे निर्माण केल्यानेच महापुराचे संकट निर्माण झाले आहे. पूर येणे ही आपली समस्या नसून, दहा ते पंधरा दिवस पूर साचून राहतो ही आपली समस्या आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापूर मानवनिर्मित असल्याचे प्रतिपादन धनाजी चुडमुंगे यांनी केले.
आलास (ता. शिरोळ) येथे दर्गा चौकात झालेल्या पूरमुक्ती जनसंवाद यात्रेच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी झाकीर पटेल होते. १६ जून रोजी दुपारी दोन वाजता आंदोलन अंकुशची नृसिंहवाडी येथे ''पूर परिषद'' होत आहे. परिषदेच्या जागृतीसाठो आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पूर्वी पडणारे पावसाचे पाणी त्याच्या मार्गाने जात होते. बंधारे, पूल आणि धरणे बांधून त्याला अडथळे निर्माण केले. त्यामुळेच शिरोळ तालुक्यात पूर ओसरण्यास जादा दिवस लागतात. त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढते. बंधारे किंवा धरण आता हटविता येणार नाहीत; पण त्याच्या बाजूला असलेले भराव काढून पाणी जाण्यास वाव निर्माण करून महापूर नियंत्रित करता येतो. शासन याकडे बघायला तयार नाही. शासनाचे या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून पूर परिषद घेत आहोत. पूरग्रस्त गावातील लोकांनी मोठ्या संख्येने पूर परिषदेला उपस्थित राहावे.’
कृष्णा देशमुख व मेजर अस्लम मखमला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एकनाथ माने, यासिन मणेर, सोमनाथ तेली, विश्राम कोळी, संजू कोळी, लियाकत पठाण, सादिक मुजावर, रफिक मुजावर, गुंडू बोरगावे, रशीद मखमला, तेजस कोळी, लक्ष्मण शेडबाळे, आदी उपस्थित होते. स्वागत राजू पटेल यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com