२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२

sakal_logo
By

82840
...

कोल्हापुरात ५ मार्चला ‘रन फॉर हेल्थ’

जिल्हाधिकारी राहुल रेखावार ः आहारात तृणधान्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम

कोल्हापूर, ता. १४ ः चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून ५ मार्च रोजी ‘रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट’ (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
२०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन
विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. वंदना जोशी, जिल्हा पणन अधिकारी चंद्रकांत खाडे, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश बन आदी उपस्थित होते. यावेळी परिसरात उभारण्यात आलेल्या विविध तृणधान्ये व त्यापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांच्या स्टॉलला जिल्हाधिकारी श्री. रेखावार व सदस्यांनी भेट दिली.
श्री. रेखावार म्हणाले, ‘पौष्टिक तृणधान्यांचे आहारात खूप महत्त्व आहे. सर्व शासकीय कार्यालये, शासकीय दवाखान्यांमधील दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा.’ प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, वसतिगृहांत देखील या आहाराचा समावेश करता येईल का, याबाबत विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
तृणधान्यांचे महत्त्व शालेय जीवनातच समजण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करून यावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करा. यात विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी करून घ्या, जेणेकरून तृणधान्याचे महत्त्व घराघरांत पोहोचेल. तृणधान्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आहारातील वापर वाढण्यासाठी सर्व विभागांनी मिळून प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. 
..........