जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय

बालिंगा-नागदेववाडी येथे मोठ्या मोऱ्या बांधाव्यात

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : पूरस्थिती निर्माण होवू नये

कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण करत असताना, हा रस्ता पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरू नये. नदी व ओढ्याच्या परिसरातील रस्त्याखाली मोठ्या मोऱ्या बांधल्याच पाहिजे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या. कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर मोऱ्या बांधण्याबाबत पूरग्रस्त गावातील वीसहून अधिक सरंपचांनी जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेवून रस्त्याची माहिती दिली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण होत असताना पुराच्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. रस्त्यामुळे पुराचे पाणी प्रवाहित होण्यापासून थांबणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्याची उंची वाढत असताना पुराचे पाणी थांबणार नाही, याची दक्षता घेतलीच पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची तत्काळ पाहणी करुन योग्य ती काळजी घेतली जाईल. एकीकडे वाहतुकीची सोय करताना दुसरीकडे लोकांना पुराचा फटका बसू नये. बालिंगा किंवा दोनवडे येथे मोठ्या मोऱ्या किंवा त्यापेक्षा इतर पर्यायाने पाण्याचा निचारा झाला पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांची काळजी घ्यावी.’
मधूकर जांभळे म्हणाले, ‘बालिंगा ते दोनवडे दरम्यान भोगावती नदी पूरक्षेत्रात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भर टाकून रस्त्याची उंची वाढवली जात आहे. ही उंची वाढवल्यामुळे पुलाच्या पूर्वेकडे दोन तर पश्‍चिमेकडे तीन मोठ्या मोऱ्या बांधाव्या लागणार आहेत. याबद्दल महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, पण त्यांच्याकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. मोऱ्या बांधणार आहोत, एवढेच उत्तर दिले जात आहे.’
यावेळी, सर्जेराव शिंदे, तानाजी पालकर, सचिन माळी, चंद्रकांत पाटील, मयूर जांभळे, शिवाजी देसाई, सुनील परीट, वसंतराव पाटील, तानाजी मोरे, दिलीप सावंत, रंगराव कोळी उपस्थित होते.
...

जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक...
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे काम सुरु असले तरीही पावसाळा जवळ येईल तशी मनात भितीचे वाटत आहे. रस्त्याची उंची वाढली तर अनेक गावांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त पाणी शिरण्याचा धोका आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूरग्रस्त गावातील वीसहून अधिक सरपंचांची बाजू ऐकून घेवून मोठ्या मोऱ्या बांधण्याचा तत्काळ सूचना देवून पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सर्व सरपंचांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com