बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवा ः केंद्रीय मंत्री आठवले.

बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवा ः केंद्रीय मंत्री आठवले.

Published on

94968

गौतम बुद्घांकडून शांततेचा संदेश
मंत्री रामदास आठवले; भीम फेस्टिव्‍हलचे उद्घघाटन

कोल्हापूर, ता. १० : गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. या दोन्ही महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोचवा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. भीम फेस्टिव्‍हलच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते.
हौसाबाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निर्माण चौकात भीम फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सतीश माळगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सांगली माजी महापौर विवेक कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्री आठवले म्हणाले, ‘गौतम बुद्ध आणि डॉ.आंबेडकरांनी कार्यातून शातंतेचा आणि सद्भावनेचा संदेश दिला. त्यांचे विचार समाजात सर्वांपर्यंत पोचावेत. यासाठी असे उपक्रम राबवावेत.’
भन्ते एस. संबोधी, विवेक कांबळे, दुर्वास कांबळे, राजेंद्र ठिकपुर्लीकर, मंगलराव माळगे, बाळासो वाशिकर, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे उपस्थित होते.
आठवलेंची नाखुशी
भीम फेस्टिव्‍हल कार्यक्रमाला तुरळक गर्दी होती. त्यामुळे मंत्री आठवले यांनी नापसंती व्यक्त केली. अशा उत्सवांची जाहिरात केली पाहिजे. अधिकाधिक माणसे कशी येतील हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com