सीसीटिव्हीमुळे पोलिस, जनतेला मदत

सीसीटिव्हीमुळे पोलिस, जनतेला मदत

Published on

10128
आजरा : सीसीटिव्ही लोकार्पण कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी मार्गदर्शन केले. या वेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अशोक चराटी, जनार्दन टोपले, दिवाकर नलवडे, राजीव नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

सीसीटिव्हीमुळे पोलिस, जनतेला मदत
महेंद्र पंडीत; आजऱ्यात लोकार्पण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १८ : लोकसहभागातून सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शहरवाशियांनी चार लाखांचा निधी जमा केला ही चांगली गोष्ट आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाला तांत्रिक मदत मिळून तपास गतीमान होणार आहे. या तिसऱ्या डोळ्यामुळे पोलिस व जनतेला चांगले सहकार्य होणार आहे, असे प्रतिपादन कोल्हापुर जिल्ही पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले.
आजरा पोलिस ठाण्यामध्ये सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा झाला. या वेळी पंडीत बोलत होते. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे - पाटील, अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, माजी पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, अबुसईद माणगांवकर प्रमुख उपस्थित होते.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पंडीत म्हणाले, ‘‘आजरा संवदेनशील आहे. जिल्ह्यात दोन वर्षे कार्यरत राहिल्यास आजरा संवेदनशील राहणार नाही असे कार्य करू. आजरा शहरात ट्रॅफिकची समस्या भेडसावत आहे. त्याची जाणीव पोलिस प्रशासनाला आहे. शहरात वाहन तळ तयार करून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू.’’ आण्णा भाऊ संस्थाचे प्रमुख चराटी म्हणाले, ‘‘पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे. तरीही पोलिसांची जनतेमध्ये प्रतिमा व काम चांगले आहे.’’ टोपले म्हणाले, ‘‘पोलिसांनी येथे विविध गुन्हांचे तपास चांगले केले आहेत. जातीय सलोखा जपण्यासाठी प्रयत्न केले आहेत.’’ निलेश घाटगे यांचेही भाषण झाले. या वेळी सरपंच संघटनेचे राज्य प्रदेश सचिव राजू पोतनीस, किरण कांबळे, अमित खेडेकर, दिलावर चॉंद यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधिक्षक राजीव नवले यांनी आभार मानले.

चौकट
कायदा जात- पात नाही ओळखत
दरम्यान, जिल्हा पोलिस पंडीत म्हणाले, ‘‘कायदा कोणतीही जात पात ओळखत नाही. तो सर्वांसाठी समान आहे. सध्या जिल्ह्यात आक्षेपार्ह स्टेटस लावण्याचे प्रकार घडल्याने सामाजिक वातावरण बिघडले होते. त्यामुळे तरुणाईला आवर घालायला हवा. पोलिसांनी कठोर कारवाई केल्यास त्यांचे शैक्षणिक करिअर उध्वस्त होवू शकते. त्यांना कौटुंबिक पातळीवर प्रबोधन करायला हवे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.