इचल:आत्मक्लेश-अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन

इचल:आत्मक्लेश-अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन

Published on

ich2610.jpg

19178
इचलकरंजी : स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने कॅण्डल मोर्चा काढला.

‘स्वाभिमानी’तर्फे कँडल मार्च
इचलकरंजी, ता. २६ : मणिपूरमधील घडलेली घटना व केंद्र सरकारची भूमिका यावरून महिलांच्या रक्षणासाठी पुढे यावे लागेल. महिलांनी घाबरू नये. तुमच्या रक्षणासाठी सदैव तयार आहे, हा विश्वास प्रस्थापित होण्यासाठी इचलकरंजीत कँडल मार्च काढला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. आत्मक्लेश-अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शिवतीर्थ ते गांधी चौक प्रयन्त कँडल मार्च काढण्यात आला. यप्रसंगी ते बोलत होते.
बुधवारी रात्री साडेसातला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कँडल मार्चला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून निघत महात्मा गांधी पुतळा येथे कँडल मार्चचा समारोप झाला. यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गुरुवारी (ता. २७) सकाळी १० वाजता वीरपत्नींच्या हस्ते सरबत घेवून आत्मक्लेश आंदोलनाची सांगता करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कँडल मार्चमध्ये मदन कारंडे, शशांक बावचकर, सदा मलाबादे, सुरेश शेट्टी, प्रसाद कुलकर्णी, प्रताप होगाडे, जालंदर पाटील, पद्माराणी पाटील, राजेश पाटील, विकास चौगुले, रूपाली पाटील, रूपाली माळी, कल्पना माळी, अनिता दळवी, प्रमोदिनी देशमाने, स्मिता चौगुले आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.