खासबाग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत द्या

खासबाग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत द्या

Published on

19180
...

खासबाग दुर्घटनेतील
कुटुंबियांना ५ लाखाची मदत द्या

भारतीय जनता पक्षाची मागणीः तहसिलदारांना निवेदन


कोल्हापूर, ता. २६ ः खासबाग मैदानाची तटबंदी कोसळल्याने अश्विनी यादव यांच्या मृत्यू झाला. तर संध्या तेली या गंभीर जखमी झाल्या. तेली यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून द्यावी. त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांना दिले. जखमी तेली यांच्या प्रकृतीची विचारपूस दवाखान्यात जावून भाजप शिष्टमंडळाने केली.
निवेदनातील माहितीनुसार, घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. महापालिका यादव आणि तेली कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यास असर्थ आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवावा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या कुटुंबियांना मदत उपलब्ध करून दिली पाहीजे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, सुनीलसिंह चव्हाण, मंडल अध्यक्ष डॉ. सदानंद राजवर्धन, रवींद्र मुतगी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---
मंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत घेऊ

जखमी संध्या तेली यांचा उपचारांचा खर्च करण्यासाठी शासनाच्या योजनेतून निधी उपलब्ध करून देऊ. मात्र शासकीय योजनेतून निधी मिळाला नाही तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी तेली कुटुंबियांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.