शहर पाऊस

शहर पाऊस

Published on

18787
शहरात पावसाचा जोर कमी
कोल्हापूर, ता. २६ ः शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून कधी रिमझिम तर कधी एखादी मोठी सर पडत होती. सकाळी काहीकाळ सूर्यदर्शनही झाले; पण प्रशासनाकडून पूर वाढणार आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी बाहेर पडावे असे सांगितले जात आहे. त्यामुळे नदी तसेच जयंती नाल्याच्या काठावरील नागरिक अस्वस्थ झाले होते. अग्निशमन दलाचे जवानही सतर्क असून, रात्री पाणी अचानक वाढले तर नागरिकांना हलवण्यास मदत करणार आहेत.
सध्या ४० फूट ५ इंच पातळी असून, राधानगरी धरणातील पाणी रात्री पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार फूट पातळी वाढण्याचा अंदाज आहे. यानुसार पाणी वाढल्यास सुतारवाड्यात पाणी येणार आहे. सध्या बहुतांश कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतपतच कुटुंबे घरात आहेत. जर तिथे वेगाने पाणी वाढले तर त्यांना स्थलांतरीत करावे लागणार आहे. त्यासाठी अग्निशमन दल सज्ज आहे.
अनेक नागरिकांनी घरातील साहित्य उंचीवर ठेवले. वाहने सुरक्षितस्थळी हलवली असून महापालिकेच्या मैदानांवरही उभी केली आहेत. शहरातील पाऊस कमी झाला असून, कळंबा तलावही अजून भरलेला नाही. त्यामुळे लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील गल्ल्यांमध्ये जयंती नाल्यातील पुराचे पाणी या स्थितीत घुसणार नाही असा अग्निशमन दलाचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.