गड-आमदार मागणी

गड-आमदार मागणी

आंबेओहळचे पाणी हिरण्यकेशीत सोडा
आमदार राजेश पाटील यांनी मागणी : जलसंपदामंत्र्यांना दिले पत्र
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : चित्री मध्यम प्रकल्पाच्या पाण्याच्या नियोजनासाठी आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आंबेओहळ मध्यम प्रकल्पाचे पाणी आवश्यकतेनुसार हिरण्यकेशी नदीमध्ये सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आंबेओहळचे पाणी हिरण्यकेशी नदीत सोडण्याची मागणी आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे, चित्री प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्राच्या पुढे नांगनूर बंधाऱ्यापर्यंत सोडले जाते. त्यामुळे प्रकल्पाच्या साठ्यात बचत व्हावी व पाणी नियोजन जूनअखेरपर्यंत विनाअडथळा पूर्ण करता यावे, यासाठी आंबेओहळ प्रकल्पातून १०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आवश्यक आहे. सद्यस्थितीत आंबेओहळ प्रकल्पाचे लाभक्षेत्र पूर्ण क्षमतेने सिंचनाखाली आलेले नाही. त्यामुळे प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा शिल्लक राहत आहे. याउलट गडहिंग्लज तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे.
या प्रतिकूल परिस्थितीत चित्री मध्यम प्रकल्पात पिण्यासाठी राखीव पाणीसाठा शिल्लक राहावा, यासाठी आंबेओहळ मध्यम प्रकल्पातून पाणी लागणार आहे. आंबेओहळच्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणी देऊनही शिल्लक राहणाऱ्या साठ्यापैकी १०० दशलक्ष घनफूट पाणी हिरण्यकेशी नदीत सोडल्यास गडहिंग्लज तालुक्यातीच्या पूर्व भागासाठी त्याचा लाभ होईल. तसेच चित्रीच्या पाणसाठ्यातही बचत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com