आजऱ्यात वारंवार वीज खंडीत

आजऱ्यात वारंवार वीज खंडीत

आजऱ्यात वारंवार वीज खंडीत
नागरीक त्रस्त; दैनंदिन जीवनासह यात्रा, लग्नसराईवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ ः आजरा तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीजेचा कडकडाट, वादळी पाऊस यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये अनेकदा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून यात्रा, जत्रा व लग्नसराईचा काळ सुरु आहे. वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याने जनतेचे हाल होत आहेत. महावितरणकडून तांत्रिक बिघाडाची कारणे सांगितली जातात. पण सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरीकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन दिवस झालेल्या वीजेच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे आजरा शहरासह निम्या तालुक्याची वीज गायब झाली होती. शहराबरोबर ६० गावे अंधारात होती. सुमारे पाच तास वीज पुरवठा खंडीत होता. वीज परत आली व लगेच गेली असा प्रकार शनिवारी (ता. ११) पहावयाला मिळाला. आज दुपारनंतर शहरात वीज पुरवठा सुरु झाला. तरी देखील गांधीनगरसह काही भागात वीज नव्हती. पेरणोली परिसरात तर गेली १८ तास वीज नव्हती. वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी तत्परता दाखवली. जंगल परिसर, वीजेच्या कडकडाटासह पाऊस, रात्रीचा अंधार अशा परिस्थितीत त्यांनी दुरुस्तीसाठी प्रयत्न चालवले होते. दहा दिवसांपुर्वी देखील असाच प्रकार घडला. त्यावेळीही कर्मचाऱ्यांनी उपाशीपोटी काम केले. हे जरी खरे असलेल तरी आजऱ्यासह निम्या तालुक्यात वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्याबाबत महावितरणने ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे. उच्च दाबाची वाहीनीसह ११ केव्हीची वाहिनी यावर बिघाड होण्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. त्याबाबत उच्च तंत्रज्ञानाची मदत घेवून कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची गरज आहे. सध्या उन्हाळ्याचा काळ सुरु आहे. या दिवसात वीजेची मागणी मोठी असते. घरातील उपकरणे, शेतीला पाणी, घरांचे बांधकाम, यात्रा व लग्नसराईचे दिवस असल्याने वीजेवर अवलंबित्व मोठे असते. अशा काळात वीज पुरवठा खंडीत होत राहील्यास त्याचा मोठा परिणाम दैनंदिन जीवनावर होतो. पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यावरही परिणाम होतो. या गोष्टींचा विचार करून वीजपुरवठा उन्हाळ्याच्या दिवसात सुरळीत कसा राहील हे पहावे, असे जाणकार नागरीकांचे मत आहे.
--------------
कोट
सुक्ष्म तांत्रिक बिघाड असतो. यासाठी प्रत्येक पोल टू पोल जावून तांत्रिक बिघाड शोधावा लागतो. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागतो. तीन वर्षांपुर्वी असे झाले होते. दोन दिवस पुर्ण वीज पुरवठा खंडीत झाला होता. यंदाही असे प्रकार अवकाळी पाऊस व वीज कोसळणे यामुळे वाढले आहेत. महावितरणकडून प्रयत्न सुरु आहेत.
- सुहास मिसाळ, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, आजरा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रणजित कालेकर.........................................................आजरा.........................................................ता. १२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com