‘बारावी’च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या गुणपत्रिका

‘बारावी’च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या गुणपत्रिका

‘बारावी’च्या विद्यार्थ्यांना
मिळाल्या गुणपत्रिका

पदवी प्रवेशाला मिळणार गती : अकरावीसाठी चार हजार जणांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर तेरा दिवसांनी आज बारावीच्या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळाल्या. या गुणपत्रिका हातात पडल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. आता पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. अकरावीच्या वाणिज्य इंग्रजी, विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी आठ दिवसांत चार हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे सकाळी अकराच्या सुमारास कनिष्ठ महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप सुरू करण्यात आले. त्यांना स्थलांतर प्रमाणपत्रदेखील देण्यात आले. गुणपत्रिका हातात पडल्यानंतर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत ‘सेल्फी’ टिपत, एकत्रित फोटो घेत आनंद व्यक्त केला. शहरातील काही महाविद्यालयांनी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाविद्यालयांना गुणपत्रिका वाटपाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याच्या दिवसापासून शहरातील २९ महाविद्यालयांमधील विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com