प्रशासन यंत्रणा राबली सलग १८ तास

प्रशासन यंत्रणा राबली सलग १८ तास

प्रशासकीय यंत्रणा राबली सलग १८ तास
मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. ४) पार पडली. सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रात आलेले कर्मचारी रात्री १२ वाजता घरी परतले. सलग १८ तास त्यांनी काम केले. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडली. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये बाधा न येता पार पडली.
जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी रमणमळा येथील धान्य गोदामात पार पडली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात पार पडली. दोन्ही ठिकाणी सुमारे ६५६ कर्मचारी आणि १२०० पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतमोजणी केंद्रावर कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता यावे लागले. त्यानंतर सर्व व्यवस्थांची खात्री करून आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. दुपारी एक ते दीड ही वेळ सोडल्यास पुन्हा मोजणी सुरू झाली. सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी रात्रीचे १२ वाजले. त्याआधी कर्मचाऱ्यांची एक टीम केंद्राबाहेर पडली. मात्र, सर्व कर्मचारी जाण्यासाठी मध्यरात्र झाली. सलग १८ तास कर्मचारी, अधिकारी, निरीक्षक यांनी काम केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यात मतदानही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

...
मोबाईल बंदी
मतमोजणीमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे १८ तासांत त्यांना कुटुंबीयांशी संवादही साधता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com