पाणी निवेदन

पाणी निवेदन

पाणीपुरवठ्याची स्थिती म्हणजे
‘नदी उशाला आणि कोरड घशाला’

कृती समितीची टीका; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कोल्हापूर, ता. ९ : शहराची पाणीपुरवठ्याची स्थिती म्हणजे ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी झाली आहे. वरिष्ठ अधिकारी पाणीपुरवठ्याकडे जबाबदारीने पाहत नाहीत. लोकप्रतिनिधी केवळ निधीची घोषणाबाजी करण्यात मशगुल आहेत. त्यामुळे शहर बेवारस झाल्याचे पत्रक कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, थेट पाईपलाईन योजना सुरळीत चालत नाही. विविध कारणांसाठी निम्म्या शहरात पाणी टंचाई असते. मोडके टँकर आहेत. काही खासगी टँकरमधून पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप नाहीत. उंच अपार्टमेंटमध्ये तळघरातील पाण्याच्या टाक्या भरून देणे गरजेचे आहे. खासगी टँकर बिल उकळण्यासाठी फेऱ्या मारतात, याकडे प्रशासकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यंत्रणा जेव्हा बंद पडेल तेव्हाच कामे केली जातात. थेट पाईपलाईन योजना वीज वाहिनीवर झाडे पडल्याने बंद राहते. त्याला पर्यायी व्यवस्था जुनी शिंगणापूर पाणी योजना सुरू करून पुरवठा करता येतो. पण, तेथील पंप नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करून ठेवणे गरजेचे आहे. प्रशासकांसह वरिष्ठ अधिकारी पाणीपुरवठ्याकडे जबाबदारीने पाहत नाहीत. लोकप्रतिनिधी निव्वळ निधीची घोषणाबाजी करतात. अधिकारी व लोकप्रतिनिधींशिवाय शहर बेवारस झाले आहे. पत्रकावर अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, विनोद डुणुंग, शंकरराव शेळके, बाबा वाघापूरकर, लहुजी शिंदे, प्रसाद बुलबुले, आदींच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com