भारत राखीव बटालियन भरती

भारत राखीव बटालियन भरती

Published on

भारत राखीव बटालियन,
मैदानी चाचणी प्रक्रिया

कोल्हापूर, ता. २ ः भारत राखीव बटालियनमधील १८२ रिक्त जागांसाठी सुमारे १२ हजार ११९ उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. त्याची प्रक्रिया पोलिस परेड मैदानावर सुरू झाली आहे. १३ जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. दरम्यान, पाऊस वाढत असल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
भरती प्रक्रियेसाठी सुमारे अडीचशे अधिकारी, कर्मचारी नियोजनात आहेत. उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते. रोज पहाटे पाचपासून भरती सुरू होते. सर्व प्रथम उमेदवारांच्या कागदपत्रांची माहिती घेऊन पडताळणी होते. नंतर उंची, छाती मोजून गोळाफेक, १०० मीटर धावण्याची चाचणी होते. पाच किलोमीटर धावण्याची चाचणी कसबा बावडा ते शिये मार्गावर होते. सुरुवातीचे दोन दिवस रोज ७५० उमेदवारांची चाचणी झाली. बुधवारपासून १३ जुलैपर्यंत रोज ११५० उमेदवारांची चाचणी होणार आहे. अधिक पावसाने मैदानी चाचणीत व्यत्यय आल्यास त्यादिवशी रद्द झालेली प्रक्रिया १४ जुलैला होणार आहे. उमेदवारांना थांबण्यासाठी अलंकार हॉलमध्ये व्यवस्था असून पाणी, ओआरएस, लिंबू सरबताची व्यवस्था मैदानावर केली आहे. प्रभारी समादेशक तथा भरती प्रमुख अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.