शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ः मनसेची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ः मनसेची मागणी

Published on

शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा
मनसेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शक्तिपीठ महामार्ग हा अनावश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सुपीक जमीन घेतली जाणार आहे. यामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त होणार आहे. त्यामुळे शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. तसेच यासाठी येणाऱ्या खर्चातून नागरिकांना तीर्क्षक्षेत्रांचे दर्शन घडवावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. नागपूर-रत्नागिरी महामार्ग होत असून त्याचा उपयोग गोव्याला जाण्यासाठी देखील होणार आहे. असे असताना कारण नसताना शक्तिपीठ महामार्ग बनवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. हा महामार्ग तयार करताना सामान्य माणसाचा कोणताही विचार केलेला नाही. यासाठी राज्यातील लाखो एकर जमीन महामार्गासाठी लागणार आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. महामार्गाचा खर्च भाविकांकडून टोलच्या रूपाने वसूल करण्यात येणार असून त्याचा भुर्दंड सामान्य भाविकांनाच टोलच्या रूपाने द्यावा लागणार आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा.
शिष्टमंडळात राजू जाधव, राजू बागवान, बबन सावरे, नयन गायकवाड, अतुल भालकर, आण्णा तिवळे, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.