पत्र

पत्र

Published on

जागते रहो !
मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्यातून नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत. भूकंप, महापूर, वीज पडणे, वादळ, भूस्‍खलन अशा आपत्तींतून निर्माण होणारी जीवित आणि वित्त हानी प्रचंड असते. या आपत्ती कायमस्वरूपी टाळता येत नसल्या तरी त्या घडू नयेत, यासाठी उपाय आणि सुरक्षितता घेणे हाच तरणोपाय आहे. पावसाचा जोर वाढू लागला की, धरण आणि नदीतून पुढे विसर्ग होणे आवश्‍‍यक असते आणि तो झाला नाही तर पाणी धोका पातळीवर येते आणि महापुराचे संकट ओढवते. अशा वेळी नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचना आणि इशारे यांचे पालन करीत स्थलांतर करणे योग्य असते. डोंगरातील लहान भेगांतून पाणी शिरत त्याच्या मोठ्या भेगा निर्माण होऊन भूस्‍खलन होण्याची शक्यता असते. ते होण्यापूर्वी निसर्गातील लक्षणे जाणून घेत भूस्खलनप्रवण गावांनी स्थलांतर करणे आवश्यक असते.
- किरण तांबे,
तळंदगे, कोल्हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.