‘अकरावी’च्या तिसऱ्याफेरीचा आज अखेरचा दिवस

‘अकरावी’च्या तिसऱ्याफेरीचा आज अखेरचा दिवस

Published on

अकरावी प्रवेशासाठी
तिसऱ्या फेरीचा आज
अखेरचा दिवस

कोल्हापूर ः शहरातील सर्व मान्यताप्राप्त २९ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमाची प्रवेश प्रक्रिया ही स्थानिक पातळीवर केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. त्याच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची उद्या, सोमवारी अखेरचा दिवस आहे. या तिसऱ्या फेरीत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. त्यात आजअखेर एकूण २५९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात विज्ञान विद्याशाखेचे विद्यार्थी २०९ आणि वाणिज्य शाखेचे ५० विद्यार्थी आहेत. सोमवारी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर केंद्रीय समितीकडे दाखल होणाऱ्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया मंगळवारी आणि बुधवारी होणार आहे. या फेरीतील निवड यादी गुरुवारी कोल्हापूर विभागीय शिक्षण संचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.