हद्दवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध

हद्दवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध

Published on

शहराच्या हद्दवाढीतून
१९ गावे वगळा

शेतकरी संघटनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः शहरातच नागरी सुविधांची वानवा असल्याने गावांचा समावेश शहरात करू नये. हद्दवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध असून, प्रस्तावित १९ गावे यातून वगळावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जोतीराम घोडके यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, शहराची हद्दवाढ होणार असे सांगण्यात येत आहे. यामध्ये शहर परिसरातील १९ गावे शहराच्या हद्दीत घेतली जाणार आहेत. याला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. शहरात बांधकाम परवाना घेण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतात. शहरात कचरा, सांडपाणी याच्या सुविधा पुरेशा नाहीत. बहुतांश भागात पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. त्या तुलनेत ग्रामपंतायतीमध्ये बांधकाम परवाना तत्काळ मिळतो. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होतो. ही गावे स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळे हद्दवाढ करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.