महापूर बाधित गावात टँकरने पाणी

महापूर बाधित गावात टँकरने पाणी

Published on

लोगो ःजिल्हा परिषद

महापूरबाधित गावांत टँकरने पाणी

पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : जिल्ह्यातील महापूर परिस्थितीत अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याचे टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल आदी तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये महापुराचे पाणी येते. त्यामुळे बरेच दिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. अशुद्ध पाणी पिल्याने गावात रोगराई पसरण्याची भीती असते. यावर पर्याय म्हणून गेली काही वर्षे पिण्याच्या पाण्याचे टँकर भाड्याने घेतले जात आहेत. ही प्रक्रिया मे, जून महिन्यात पूर्ण करून गरज पडेल तसे या टँकरने पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती तयार होते. या सर्वांचा विचार करूनच विभागाने टँकर भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
नदीकाठच्या अनेक गावांना नदीतूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. महापुरामुळे हा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. अशा गावांना शासकीय पाण्याच्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे टँकर कमी पडत आहेत. त्यामुळेच भाड्याची टॅंकर घेण्याची प्रक्रिया केल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.