पंचगंगा प्रदूषण जिल्हाधिकारी बैठक बातमी

पंचगंगा प्रदूषण जिल्हाधिकारी बैठक बातमी

Published on

कारखान्यांचे सांडपाणी
प्रक्रिया प्रकल्प सुस्थितीत ठेवा

जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखानदारांना सूचना


कोल्हापूर, त ११ : पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या साखर कारखान्यांनी आपले औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुस्थितीत ठेवावेत. कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया करूनच पुढे सोडले जावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत त्यांची आज बैठक झाली.
पंचगंगा नदीकाठी सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. काही साखर कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी थेट नदीत गेल्याचे गळीत हंगामात निदर्शनास आले होते. अशा कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमध्ये औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती वेळच्यावेळी करा. हंगामाच्या काळात हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याची खबरदारी घ्या. तसेच कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा अधिक पुनर्वापर कसा कराता येईल याचेही नियोजन करा, असे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.