पर्यावरण तज्ञ बाचुळकर यांचे व्याख्यान बातमी

पर्यावरण तज्ञ बाचुळकर यांचे व्याख्यान बातमी

Published on

02630

वृक्षतोड थांबल्यासच
पर्यावरण संतुलन : बाचूळकर
सिद्धनेर्ली ः वृक्षारोपण काळाची गरज आहे. वृक्षतोड थांबली तरच पर्यावरण संतुलन राहील, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केले. कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरार्थीना मार्गदर्शनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच यशवंत पाटील होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. जमिनीचे खाणकाम थांबले पाहिजे. ऊसाचे पाचट पेटवून त्यापासून मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’ सह्याद्री देवराईचे मार्गदर्शक सुहास वायंगणकर, वनमित्र संस्थेच्या गंगाधरे यांनीही मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांची ओळख मधुकर येवलुजे यांनी करून दिली. सरपंच उपसरपंच संगीता पोवार, सदस्या वनिता घराळ, रत्नप्रभा गुरव, कल्याणी कुरणे, मधुकर आगळे, मनोहर लोहार, मधुकर येवलुजे, विवेक पोतदार,दादोबा गोनुगडेंसह डी. आर. माने कॉलेजचे शिक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.