एकोंडी कृषिकन्या उपक्रम

एकोंडी कृषिकन्या उपक्रम

Published on

एकोंडीत शेती कार्यशाळा
सिद्धनेर्ली ः एकोंडी (ता. कागल) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी कन्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व सांगत जीवामृताचे प्रात्यक्षिक सादर केले. गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ, गूळ,मुठभर बांधावरची माती आणि पाणी यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण करून ते दोन दिवस आंबवून जीवामृत द्रावण तयार होते. हे द्रावण वापरल्याने मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढून,मातीचा कस जपण्यास मदत होते. त्याचे अशा पद्धतीने अनेक फायदे असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते असे कृषी कन्यांनी सांगितले. यामध्ये साक्षी शिंदे, ऋतुजा शितोळे, स्नेहा रोंगे, संध्या पाटील, सलोनी शिंदे, साक्षी साबळे, निवेदिता शिरुरे या कृषी कन्यांचा सहभाग होता. त्यांना प्राचार्य आर. डी. बनसोड, डॉ. बी. टी. कोलगणे, डॉ.सी.व्ही.मेमाणे यांचे मार्गदर्शन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.