प्रकल्प रद्द होईपर्यंत उपोषणाचा निर्धार

प्रकल्प रद्द होईपर्यंत उपोषणाचा निर्धार

Published on

प्रकल्प रद्द होईपर्यंत
उपोषणाचा निर्धार
शाहूनगर, ता. ७ ः कौलव (ता. राधानगरी) येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी २४ जूनपासून सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण रविवारी चौदाव्या दिवशीही सुरूच होते. जोपर्यंत शासन हा प्रकल्प रद्द करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
गायरानातील ४० एकर क्षेत्रात एमआयडीसी सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी सर्व्हेही झाला असून, ग्रामस्थांना व ग्रामपंचायतला विश्वासात न घेता शासनाने काही जमिनींचे संपादनही केले आहे. एमआयडीसीला स्थानिकांचा विरोध असतानाही लोकभावनेचा विचार न करता शासनाने हा प्रकल्प ग्रामस्थांच्या माथी लादण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच राहील. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास नियोजित एमआयडीसी प्रकल्पाविरोधातील लढा आणखी तीव्र करू, असे बाबूराव खडके यांनी सांगितले. यावेळी धोंडिराम पाटील, साताप्पा पाटील, भीमराव पाटील, महेश पाटील, पांडुरंग पाटील, मधुकर पाटील, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.