देशातील लोकशाही टिकविण्यासाठी भारतीय संविधान टिकवणे काळाची गरज.

देशातील लोकशाही टिकविण्यासाठी भारतीय संविधान टिकवणे काळाची गरज.

हळदीत रविवारी
संविधान बचाव परिषद
सोनाळी ता. २९ : लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवणे गरजेचे आहे. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) यांच्यातर्फे रविवारी (ता. ३) संविधान बचाव परिषदेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी दिली.
ते हळदी (ता. करवीर) येथे रावजी कामते सांस्कृतिक भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याध्यक्ष पी. एस. कांबळे म्हणाले, ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून
काहींनी संविधानसंदर्भात जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. याबाबत सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी संविधान बचाव परिषद व संविधान जनजागृतीसाठी दौरा आखला आहे. या परिषदेचा भाग म्हणून हळदी (ता. करवीर) येथे रविवारी संविधान बचाव परिषद आहे. परिषदेचे उद्घाटन डॉ. राजेंद्र गवई यांच्याहस्ते तर अध्यक्षस्थानी पांडुरंग कांबळे असतील. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, सुबोध वाघमोडे, गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळेंसह मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी उपस्थित राहावे.’ यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष पी. एस. कांबळे, निवास सडोलीकर, आर. एस. कांबळे, प्रकाश कांबळे, भीमराव कांबळे, बबन कांबळे, भगवान कांबळे, अशोक घाडगे, ओमकार कांबळे, साताप्पा कांबळे, राजरत्न कांबळेंसह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com