राजाराम तलावातील मधला भराव नजरेस   सुमारे 19वर्षानंतर मधला भराव दिसल्या ची स्थानिक लोकांची माहिती

राजाराम तलावातील मधला भराव नजरेस सुमारे 19वर्षानंतर मधला भराव दिसल्या ची स्थानिक लोकांची माहिती

00340

पाणी पातळी खालावल्याने
राजाराम तलावातील भराव नजरेस

सकाळ वृत्तसेवा

उचगाव, ता. १० ः सरनोबतवाडी, उजळाईवाडी परिसरात असणाऱ्या राजाराम तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ऐतिहासिक राजाराम तलावातील मधला भराव खुला झालेला आहे हा खुला झालेला मधला भराव १९ वर्षांनंतर पाहायला मिळाला, असे नागरिकांनी सांगितले.
बंधाऱ्याच्या भिंतीला लाटांचा व पाण्याचा जोरदार मारा होऊ नये व बंधाऱ्याला धोका पोहोचू नये यासाठी हा बंधाऱ्यापासून ५०० मीटर वर आडवा बंधारा केला जातो.
छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेला सरनोबतवाडी उजळाईवाडी परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक राजाराम तलावाची पाणी पातळी सध्या पाऊस नसल्याने खालावली आहे. त्यामुळे तलावामध्ये असणारा मधला भराव दृष्टिक्षेपात येत आहे. हा मधला भराव १९ वर्षांनंतर खुला झाला. यापूर्वी २००५ मध्ये असा भराव दिसला होता, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली.

कोट
उपसाबंदी असतानाही उपसा
राजाराम तलाव दरवर्षी ओव्हरफ्लो होण्याची गरज आहे. दोन वर्षांमध्ये राजाराम तलाव ओव्हरफ्लो न झाल्याने पाणी बाहेर पडले नाही; परंतु शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय यांनी उपसा सुरूच ठेवला. राजाराम तलावावर उपसाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात राजाराम तलावावरून उपसा होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com