गांधीनगर योजनेचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

गांधीनगर योजनेचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद
Published on

गांधीनगर योजनेचा
पुरवठा तीन दिवस बंद
उजळाईवाडी, ता. १८ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील तेरा गावांचा पाणीपुरवठा आजपासून सलग तीन ते चार दिवस बंद राहणार आहे. महामार्गाच्या सहा पदरीकरणादरम्यान लक्ष्मी टेकडी येथे तीन ठिकाणी गळती लागली असून गळती काढण्यासाठी तीन दिवस लागणार असल्याने तीन ते चार दिवसांसाठी पाणीपुरवठा ठप्प होणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणाकडून संबंधित ग्रामपंचायतींना पत्रकाद्वारे कळविण्यात आली.
दरम्यान, मुसळधार पावसामध्ये तेरा गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. नागरिकांकडून मात्र लवकरात लवकर गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. सततची गळती अपुरा अनियमित व काही वेळेस अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकली असून तेरा गावांतील नागरिकांना यामुळे वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.