पान ४

पान ४

Published on

दाजीपूर अभयारण्य परिसरात
ाकचऱ्याचे ढीग ‘जैसे थे’

विल्हेवाट लावण्यात प्रशासन असमर्थ

राशिवडे बुद्रुक : अभयारण्य क्षेत्रात अज्ञातांनी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात वन्यजीव खाते व प्रशासनही असमर्थ ठरले. हा सर्व जैविक कचरा असेल असे गृहीत धरून आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा हॉटेल आणि अन्य असल्याने उचलण्यास टाळाटाळ केली. यामुळे अजूनही या कचऱ्याचे ढीग तसेच आहेत, याची दुर्गंधी वाढू लागली आहे. याचा नाहक त्रास रहिवाशांना होत आहे.
काल अभयारण्यातील दाजीपूर ते एजिवडे यादरम्यान अज्ञात ट्रक मधून आणलेला हॉटेलमध्ये व अन्य ठिकाणचा जैविक कचरा सहा ते सात ठिकाणी टाकला आहे. दीडशे ते पावणेदोनशे पोती असलेला हा कचरा यामध्ये हॉटेल जेवणाचे खरकटे यासह प्लास्टिक हँड ग्लोज यांचा समावेश आहे. टाकलेल्या अनेक ठिकाणी कालपासून याची दुर्गंधी सुटली होती. आज पावसाने उघडीप घेतल्याने उन्हामुळे दुर्गंधी दुप्पट वेगाने वाढली पसरली आहे. इतकेच नाही तर या परिसरात कधीही माशांचा त्रास नव्हता या कचऱ्यामुळे नागरिकांना व हॉटेल व्यवसायिकांना माशांचा त्रास सुरू झाला आहे.
या कचऱ्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच प्रशासनाने महानगरपालिकेची गाडी पाठवून दिली. मात्र हा कचरा जैविक कमी आणि हॉटेलचा अधिक प्रमाणात असल्याने तो उचलण्यास टाळाटाळ केली. एजीवडेतील आठ-दहा पिशव्या उचलल्या आणि सफाई झाल्याचे नाटक केले. मात्र त्यापुढील गावात व मार्गावर कचऱ्यांचे ढीग अद्यापही रस्त्याकडेला तसेच पडलेले आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याची माहिती हॉटेल व्यवसायिक व नागरिक युवराज मांढरे यांनी दिली. हा कचरा ताबडतोब उचलावा अशी ही नागरिकांनी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.