Krishna-Warna River : कृष्णा-वारणा नदीत सोडली मळी; साखर कारखान्यांचा पुन्हा ‘काळा’ कारभार, नदीत मासे मेल्याने कारस्थान चव्हाट्यावर
Sugar Factory Pollution : पाण्याचा रंग काळवंडल्याने साखर कारखान्यांकडून नदीत मळी सोडल्याचा संशय बळावला आहे. दरवर्षी गळीत हंगाम संपताच वाहत्या पाण्याच्या ‘टायमिंग’चा अंदाज घेऊन सांडपाणी सोडण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
सांगली : कृष्णा नदीच्या पाण्याला आज सकाळी दुर्गंधी यायला लागली, शेकडो मृत मासे पाण्यावर तरंगायला लागले. पाण्याचा रंग काळा पडल्याचे आढळून आले. नदीत मळी सोडण्याचे पाप साखर कारखानदारांनी केल्याचे स्पष्ट झाले.