करेक्ट कार्यक्रम होणार? महाविकास आघाडीचा भाजपाला 3 जागांचा प्रस्ताव

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील
NCP-BJP-Shivsena
NCP-BJP-Shivsenagoogle
Summary

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक निर्णायक टप्प्यावर आली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढतीची चिन्हे असताना बिनविरोध निवडीसाठीही प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू आहे. महाआघाडीने भाजपला तीन जागांचा प्रस्ताव दिला आहे. परंतु भाजपचा पाच जागांचा आग्रह असून उशिरापर्यंत त्यावर एकमत झाले नव्हते. एकीकडे महाआघाडीने तीन जागांचा प्रस्ताव दिला असला तरी तडजोड न झाल्यास भाजपने स्वतंत्र पॅनेलची तयारी केली आहे. मंगळवारी (९) सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या घडामोडी पाहिल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची घोषणा केली. तर भाजपने शेतकरी विकास पॅनेल उभे करणार असल्याचे जाहीर केले. महाआघाडीतील नेते मंडळींच्या चर्चेनुसार राष्ट्रवादी ११, कॉंग्रेस ७ आणि शिवसेना ३, असा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित केला आहे. तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादीला स्वीकृत सदस्यांची प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागेवरून मतभेद निर्माण झाले होते. एकीकडे महाआघाडी म्हणून निवडणूक लढण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

NCP-BJP-Shivsena
रुग्ण जिवंत मग अंत्यसंस्कार कुणावर? 'CPR'मधील कारभार

महाआघाडीने भाजपला तीन जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र जिल्ह्यातील भाजपची ताकद पाहता त्यांनी पाच जागा मागितल्या आहेत. भाजपला तीन जागा देण्याचे निश्‍चित झाल्यास राष्ट्रवादी, कॉंग्रेस व सेनेला प्रत्येकी एक जागा सोडावी लागणार आहे. महाआघाडीच्या प्रस्तावावर एकमत न झाल्यास स्वतंत्र लढण्याची भाजपची तयारी आहे. बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू असले तरी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

एकीकडे ही परिस्थिती असताना खानापूर तालुक्यात सोसायटी गटातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर बिनविरोध निवडून येणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. कारण या गटात आता आमदार बाबर यांच्यासह राष्ट्रवादीचे ॲड. बाबासाहेब मुळीक व वैभव पाटील यांचे अर्ज शिल्लक आहे. महाआघाडी धर्म निश्‍चितच पाळला जाणार असल्यामुळे आमदार बाबर यांचा विजय निश्‍चित मानला जातो. त्यासाठी मंगळवारी (९) दुपारी तीनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तसेच आटपाडी तालुक्यात सोसायटी गटात शिवसेनेचे तानाजी पाटील व भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे दोनच अर्ज बाकी आहेत. त्यामुळे येथे दुरंगी लढतीची चिन्हे आहेत. कडेगाव तालुक्यात सोसायटी गटात आमदार मोहनराव कदम हे देखील बिनविरोध निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

NCP-BJP-Shivsena
ममतांच्या मुख्य सल्लागाराला जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक

प्रसंगी भाजप लढणार

माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘‘जिल्हा बॅँक ही आर्थिक संस्था आहे. या ठिकाणी राजकारण करू नये, अशी भाजपची भूमिका आहे. भाजपने स्वतंत्र निवडणुकीची तयारी केली आहे. पॅनेल तयार आहे. राष्ट्रवादीशी चर्चा फिस्कटली तरी भाजपचे शेतकरी विकास पॅनेल निवडणूक लढवेल.’’

काही जागांवर लढतीची चिन्हे

जत तालुक्यात बिनविरोध निवडीसाठी नेते मंडळींना फार प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे तेथे लढत अटळ मानली जाते. तसेच काही गटात उमेदवारांनी पूर्वीपासून जय्यत तयारी केली आहे. दौरे केलेत. त्यामुळे ऐनवेळी ते माघार घेण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे काही जागांवर लढतीची चिन्हे आहेत.

NCP-BJP-Shivsena
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीचे कारण काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com