Rohit Patil
Rohit Patilesakal

Rohit Patil : भरपाई न देणाऱ्या विमा कंपन्यांना ‘येरवडा’ दाखवा; आमदार रोहित पाटील यांची विधिमंडळात मागणी

Tasgaon News : विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जात आहे. वेळेवर विमा न दिल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. या विमा कंपन्यांना येरवडा जेलमध्ये पाठवा,’’ अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना केली.
Published on

तासगाव : ‘‘शेतकरी विमा कंपन्यांबाबत अनेक शेतकरी तक्रार करत आहेत. विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जात आहे. वेळेवर विमा न दिल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. या विमा कंपन्यांना येरवडा जेलमध्ये पाठवा,’’ अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना केली. मतदारसंघातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाही त्यांनी मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com