
पलूस : ‘‘शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना अनेकांच्या जमिनी आरक्षित झाल्या आहेत. नव्याने निर्माण झालेल्या राज्यातील सर्व नगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. पलूस शहरातील विकास आराखड्यासाठी शेतकरी व इतरांच्या जमिनी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. अन्याय झालेल्या आरक्षण बाधितांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेईन,’’ असा ठाम विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी दिला.