किल्लेमच्छिंद्रगड : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ८० च्या दशकानंतर आपल्या समाजात नैतिक मूल्यांचा अभाव दिसून येत आहे. ही कमतरता आपल्या समाजातील सामाजिक समतोल बिघडवत आहे आणि नैतिकतेच्या अभावामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व कमकुवत होत आहे..याबाबत समाजातील विविध घटकांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, आजच्या तरुणांमध्ये नैतिक मूल्यांचा अभाव आहे. या अध्ययनात ७०% तरुण नैतिक मूल्यांना महत्त्व देत नसल्याचे दिसते किंबहुना नैतिक चारित्र्य, जबाबदारी म्हणजे काय, याची त्यांना जाण नसल्याचे समोर आले आहे..या समस्येचे निराकरण करण्यासाठी, शासनाने शिक्षण प्रणाली सुधारण्याचा आणि समाजाने कुटुंबातील नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यावर आणि माध्यमांचा सकारात्मक वापर करण्यावर जोर दिला पाहिजे. तशी काळाची गरज निर्माण झाली आहे..जर आपण ही पावले उचलली तर आपण समाजात नैतिकता वाढवू शकतो आणि समाज एकसंध ठेवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याबरोबर नैतिक अधिष्ठान असलेली युवा पिढी घडवण्यात यशस्वी होवू शकतो. त्यासाठी शासनाबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.