
श्रीगोंदे, (नगर): तलाठी कार्यालयातून विविध दाखले देणे बंद केल्याने सामान्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी तलाठी महासंघाने असे दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णयात तरतूद नसल्याने ते वितरण बंद केले. एक महिना होऊनही शासनाने कुठलेही शुद्धिपत्र किंवा दाखले वितरित करण्यासंदर्भात आदेश दिले नसल्याने सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिला.
दरेकर म्हणाले, असे दाखले मिळत नसल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यात प्रामुख्याने विद्यार्थी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
तलाठी कार्यालयांमार्फत वितरण बंद केलेले रहिवासी, उत्पन्नाचा, वारस, विहीर असल्याचा किंवा नसल्याचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला असे वीस प्रकारचे दाखले मिळत नसल्याने सामान्य माणूस तहसील कार्यालयात आशेपोटी हेलपाटे मारत आहे. या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांची अजूनच कुचंबणा होते.
दरेकर म्हणाले, 'या संदर्भात तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता शासन निर्देश करत नाही तो पर्यंत आम्ही दाखले देऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे लवकरच श्रीगोंदे तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. याप्रश्नी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन या दाखल्यांचे वितरण सुरू न केल्यास तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.