
सांगली ः दिवाळीच्या बाजारासाठी सांगलीकर बाहेर पडले आहेत. बाजारपेठेत प्रचंड गर्दी आहे. नो मास्क-नो एंट्री हा नारा फक्त फलकावर आहेत, प्रत्यक्ष मास्क वापराबाबत अत्यंत निष्काळजीपणा दिसतो आहे. व्यापाऱ्यांनी या काळात ग्राहकांचे स्वागत करावे की त्यांना नियमांची सक्ती करावी, या गोंधळात आहेत. काही व्यापाऱ्यांनी सक्तीचा प्रयत्न केला तर भांडणाचे प्रसंग उद्भवल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.
पुढील आठ ते दहा दिवस जिल्ह्यासाठी परीक्षेचा काळ आहे. या घडीला सारे आलबेल दिसते आहे. कोरोना नियंत्रणात आला आहे. दररोज 1 हजार ते 1100 रुग्णसंख्या वाढत होती. ती आता दोनअंकीवर आली आहे. सांगली, मिरज या हॉटस्पॉटमध्येही रुग्णसंख्या मर्यादित आहे. ही अशीच राहील का, याबाबत मात्र फार शंका आहेत. कारण, कोरोनाची साथ इतकी भयावह ठरलेली असताना सांगलीकर बेसावध आहेत. कापडपेठ, गणपती पेठ, मारुती रस्ता, हरभट रस्ता आणि सराफ पेठ या सांगलीतील मुख्य पेठांमध्ये एकसारखीच अवस्था आहे. नो मास्क अन् प्रचंड गर्दीमुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती खरी ठरेल, अशी शंका बळावली आहे.
व्यापारी एकता संघटनेचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, ""व्यापाऱ्यांनी सक्तीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र लोकांचा प्रतिसाद फारचा चांगला नाही. हे संकट आहे. अशावेळी लोकांनी अधिक सावध राहिले पाहिजे. माझ्या दुकानात तर मास्क सक्तीच्या मुद्यावर भांडणारा प्रसंग उद्भवला. अशावेळी काय करावे? व्यापारी बांधव आपल्या परीने प्रबोधन करत आहेत.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.