तीर्थक्षेत्र विकास ‘जीआर’च्या प्रतीक्षेत

तीर्थक्षेत्र विकास ‘जीआर’च्या प्रतीक्षेत

कोल्हापूर - अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद केली असली तरी त्याचा शासन निर्णय झाला नसल्याने कामे निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू होईल, असे सांगितले होते; मात्र निविदा प्रक्रियाच झाली नसल्याने डिसेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्‍यता मावळली आहे. 

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी २५० कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ८५ कोटींची कामे होणार आहेत.

या रकमेची आर्थिक तरतूद ही शासनाने केली आहे. त्यात दर्शन मंडप, भक्त निवास, बहुमजली पार्किंग, अशी कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील कामांचा आराखडा तयार करून महानगरपालिकेने राज्य शासनाकडे सादर केला आहे, मात्र शासनाने आर्थिक तरतूद केली असली तरी त्याबाबतचा शासन निर्णय अद्याप झालेला नाही.

शासन निर्णय नसल्याने निविदा प्रक्रिया ही अडकून पडली आहे. आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात गाडी अड्डा येथील जागेत पार्किंग व भक्त निवास बांधण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्याची आर्थिक तरतूद केल्याने महानगरपालिकेने येथील अतिक्रमण हटवून जागा स्वच्छ केली आहे. तसेच लोखंडी गेट लावून बोर्ड लावला आहे. रिकाम्या झालेल्या या जागेत तात्पुरत्या स्वरूपात भाविकांच्या पार्किंगला सुरुवातही केली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जी.आर.ची प्रक्रिया सुरू आहे. अधिवेशनाच्या धामधुमीत हा विषय मागे राहिला होता. अधिवेशन काळात हा याबाबतचा जी.आर. निघूही शकेल.
- चंद्रकांत पाटील,
पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com